प्रीमिअर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) १५ गुणांच्या नव्या नियमांमुळे प्रत्येक सामना रंगतदार होणार आहे. त्यामुळे खेळाडूंची खरी कसोटी लागणार आहे, असे मत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने व्यक्त केले. २ जानेवारीपासून पीबीएलला सुरुवात होणार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
‘‘काही नवीन नियमांमुळे ही लीग मनोरंजक होणार आहे. या नियमांमुळे आमचा कस लागणार आहे. १५ गुणांमुळे प्रत्येक गेमवर पकड कायम राखणे गरजेचे आहे. प्रत्येक दिवशी गुणतालिकेत नवीन संघ आघाडीवर गेलेला पाहायला मिळेल,’’ असे सिंधू म्हणाली.
First published on: 23-12-2015 at 04:59 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Real test of player due to new rule sindhu