रत्नागिरी जिल्ह्यातील पावसजवळ असलेल्या गणेशगुळे येथील समुद्रकिनाऱयावर तीन तरूण रविवारी पाण्यात बुडाले. यामध्ये दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर एका तरुणाला वाचविण्यात स्थानिकांना यश मिळाल्याचे वृत्त आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाण्यात बुडून मृत पावलेले दोन्हीही तरूण कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील राहणारे आहेत. रविवारच्या सुटीमुळे ते गणेशगुळे येथील समुद्रकिनाऱयावर फिरण्यासाठी आले होते.  त्यावेळी समुद्राला भरती आली होती. मात्र, ओहोटी लागल्यावर तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने अचानक बुडू लागले. यावेळी किनाऱयावर असलेल्या इतरांनी आरडाओरडा सुरू केल्यावर काही लोकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण केवळ एकाचेच प्राण वाचविण्यात लोकांना यश आले. ब्रिज सोनी आणि नरसिंह अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two person drowned in ratnagiri district