भाईंदर (प.) आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या १२वीतील एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली.विकी रवींद्र शिंदे (१८) असे गळफास घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव असून, दुपारी त्याने आपल्या तळमजल्यावरील खोलीचे दार लावून घेतले होते.
सायंकाळ झाली तरी विकी खोलीतून बाहेर येत नसल्याचे पाहून दार तोडले असता तो पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. भाईंदर येथील लोकमान्य महाविद्यालयात तो शिकत होता.आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. ‘पप्पा, आई मी देवाघरी चाललो,’ असा मजकूर चिठ्ठीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 26-11-2012 at 02:38 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student suicide by hanging himself