पालघर : जांभूळ फळांच्या माध्यमातून दरवर्षी चार ते पाच कोटींची उलाढाल करणारे जांभूळ गाव बहाडोली अडचणीत सापडले आहे. फळ काढणीचा हंगाम लांबल्याने व कडक उन्हामुळे बहुतांश जांभळाच्या झाडांची मोहोर फुले करपल्याने जांभूळ उत्पादक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर तालुक्यात वैतरणा नदीच्या काठावर बहाडोली व इतर गावे वसलेली आहेत.  दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात जांभळाच्या काढणीचा व विक्रीचा हंगाम सुरू होतो.  निसर्गाच्या लहरीपणामुळे या वर्षी अजूनपर्यंत जांभुळ फळाच्या काढणीचा हंगाम सुरू झालेला नाही. ज्या झाडांना फळे आलेली आहेत अशा झाडांची सुमारे वीस टक्के इतकीच फळे काढणी झालेली आहे. बहाडोली व इतर गावांमध्ये पाच हजारांहून अधिक जांभूळ फळझाडे आहेत.   एका झाडापासून ४० ते ६० हजारांपर्यंतचे उत्पन्न जांभूळ उत्पादकांना प्राप्त होते.  पावसाळा तोंडावर असल्यामुळे हे पीक वाया जाणार असल्याची चिंता येथील जांभूळ उत्पादकांना आहे. काही झाडांना फळे आली असली तरी ती परिपक्व नाहीत. अशातच पाऊस पडला तर संपूर्ण पीक वाया जाईल व मोठे आर्थिक नुकसान होईल अशी भीती व्यक्त होत आहे

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jamun growers facing financial difficulties in palghar district zws
First published on: 25-05-2022 at 00:23 IST