पालघर: राज्य परिवहन मंडळाने महिला प्रवाशांसाठी तिकीट भाडय़ात ५० टक्के सवलत दिल्याने पालघर विभागात महिला प्रवाशांची संख्या सुमारे पाच हजारांनी वाढली आहे. असे असले तरी रोख उत्पन्नामध्ये घट झाल्याचे दिसून आले असून  या निर्णयामुळे तीन व सहा आसनी रिक्षा चालकांवर मात्र संकट ओढवले आहे. त्यांची उपासमार सुरू असल्याचे त्यांच्याकडून म्हटले जाते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य परिवहन मंडळाने १६ मार्चच्या मध्यरात्रीपासून महिला प्रवाशांकरिता तिकीट भाडय़ात ५० टक्के सवलत दिली आहे. ज्या ठिकाणी खासगी सेवेद्वारे प्रवासाकरिता २० ते ४० रुपये खर्च होत होता, त्या ठिकाणी १० ते १५ रुपयांत एसटी प्रवास  होऊ  लागला आहे.   पालघर विभागातील एसटी बसफेऱ्यांच्या माध्यमातून दररोज एक लाख पाच हजार किलोमीटर इतका प्रवास होत असतो. यामधील भारमान ४६ वरून ५० गुण इतके वाढले असले तरीही यापूर्वी होणारे सुमारे ४२ लाख रुपयांचे रोख उत्पन्न घटून ते ३७ लाख  रुपयांपर्यंत आले आहे. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सवलत विचाराधीन घेतल्यास राज्य परिवहन मंडळाचा दैनंदिन दोन लाख रुपयांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus discount number of women passengers is more than five thousand ysh
First published on: 29-03-2023 at 00:02 IST