-
२५ फेब्रुवारी १९७४ ला जन्मलेल्या दिव्याने वयाच्या १९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तिचा मृत्यू अपघात होता की घातपात हे गूढ कायम आहे. (Photo Credit : Express Archives)
-
'विश्वात्मा' या सिनेमातून दिव्या भारतीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
-
१९९१ ते १९९३ या दोन वर्षांच्या कालावधीत दिव्याने १५ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं.
-
दिव्या भारतीने शाहरुख खान सोबत 'दिवाना' या सिनेमात काम केलं होतं.
-
दिव्याने हिंदीच नाही तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही काम केलं होतं.
-
दिव्या भारतीचं सौंदर्य आणि तिचा अभिनय दोन्ही मोहून टाकणारचं होतं.
-
गोविंदासोबत दिव्याने शोला और शबनम या सिनेमात काम केलं होतं.
-
दिल आशना है या सिनेमातल्या तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. दिव्या भारतीच्या कुटुंबीयांपैकी कुणीही सिनेसृष्टीतले नव्हते.
-
रंग हा दिव्या भारतीचा अखेरचा सिनेमा ठरला. शतरंज हा सिनेमा आधी शूट झाला होता मात्र तो तिच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला.
-
दिव्या भारती ५ एप्रिल १९९३ ला वर्सोवा येथील तिच्या फ्लॅटची गॅलरीतून खाली पडली आणि त्यातच तिचा अंत झाला. दिव्या भारतीचा मृत्यू ज्याप्रकारे झाला त्यानंतर त्या घटनेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. तिच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे. दिव्या भारतीच्या मृत्यूला २८ वर्षे लोटली आहेत तरीही ती लोकांच्या स्मरणात आहे.
दिव्या भारती : बॉलिवूडला पडलेलं एक सुंदर स्वप्न; मृत्यूचं रहस्य आजही कायम
Web Title: Remembering divya bharti on her death anniversary a pictorial tribute sdn