माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे चार अध्यासनांची स्थापना करण्यात आली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (राजकीय तत्त्वज्ञान), गोपाळ कृष्ण गोखले (नीतिमूल्याधिष्ठित राज्यकारभार), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (सामाजिक न्याय) आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (सार्वजनिक वक्तृत्वकला) या नेत्यांच्या नावाने ही अध्यासने स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांनी दिली.
या चारही नेत्यांच्या विचारांचा व कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, धोरणात्मक निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीवर त्याचा परिणाम व्हावा, अशी कराड यांनी अध्यासनाची भूमिका मांडली. या वेळी तुषार गांधी, दीपक टिळक, अॅड. सुनील गोखले, अंजली मायदेव-आंबेडकर, देवेन्द्र फडणवीस, अरविंद गोखले, किरण ठाकूर, मिलिंद कांबळे, श्रीकांत भारतीय, व्ही. एस. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 4th Aug 2013 रोजी प्रकाशित
‘माईर्स एमआयटी’ तर्फे चार अध्यासनांची स्थापना
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे चार अध्यासनांची स्थापना करण्यात आली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 04-08-2013 at 02:34 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foundation of 4 chairs by m i t