एस. वाय. कुरेशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राबाबतच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी राज्यपालांविषयी काढलेले उद्गार चिंतनीय आहेत. त्या संदर्भात अन्य राज्यपालांच्या वर्तनाकडे पाहावे लागते आणि निवडणूक आयोगाचा ‘लाभाचे पद’विषयक निवाडा गुलदस्त्यात ठेवणाऱ्या राज्यपालांचे वर्तन तर राज्यघटनेशी विसंगत ठरते..
महाराष्ट्रातील आमदारांच्या अपात्रतेविषयीची सुनावणी सुरू असताना पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाचे प्रमुख म्हणून सरन्यायाधीश धनंजय य. चंद्रचूड यांनी राज्यपालांची भूमिका व अधिकारक्षेत्र यांविषयी जे उद्गार काढले, ते या न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या निकालाशी थेट संबंधित नसले तरी तेवढय़ाने ते बिनमहत्त्वाचे ठरत नाहीत. ‘राज्यपालांनी राजकीय बाबींत शिरू नये’ अशा अर्थाचे विधान सरन्यायाधीशांनी केलेले असून ‘सरकार पडेल, अशी कृती राज्यपालांनी स्वत:हून करू नये’ हा त्याच विधानाच्या पुढल्या भागाचा आशय आहे. महाराष्ट्राचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्याबाबत काहीएक नियम व संकेतांचे गांभीर्य पाळून, येथे मतप्रदर्शन न करणेच योग्य ठरेल. परंतु राज्यपालपद ही घटनात्मक संस्था आहे आणि त्या पदावरील व्यक्तीच्या अधिकारक्षेत्राबाबत, राज्यपालांनी राजकीय पक्ष-निरपेक्ष राहावे असा दंडकही राज्यघटनेने घालून दिला आहे. हे पाळले जात नाही म्हणून न्यायमूर्तीना अशी विधाने करावी लागत असतील, तर मग राज्यपालांचे प्रक्रियात्मक आणि घटनात्मक अधिकार काय, हा प्रश्न पुन्हा उद्भवतो.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During the hearing about maharashtra the statement made by the chief justice about the governor is thought provoking amy
First published on: 21-03-2023 at 02:17 IST