खूप पाणी प्यायल्याने किडनीचे विकार बरे होतात का? तज्ज्ञ काय सांगतात?
किडनी किंवा मूत्रपिंड हा असाच एक शांत पण अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. निरोगी किडनी दर मिनिटाला सुमारे अर्धा कप रक्त फिल्टर करून शरीरातील विषारी पदार्थ व जास्तीचं पाणी बाहेर टाकते आणि मूत्र (लघवी) तयार करते. रक्तातील विषारी द्रव्यं गाळणं, पाणी-खनिजांचं संतुलन राखणं, रक्तदाबावर नियंत्रण ठेवणं, हाडं आणि रक्तनिर्मितीची काळजी घेणं या सगळ्या जबाबदाऱ्या किडनी दररोज अचूक पार पाडते.