२० वर्षांनी ‘जत्रा २’ पुन्हा येणार का? केदार शिंदेंनी दिली ‘ही’ अपडेट; म्हणाले…
२००५ साली आलेल्या 'जत्रा' सिनेमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं आणि आजही त्याची जादू कायम आहे. 'जत्रा २'ची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती, पण पुढे काहीच अपडेट मिळाली नाही. केदार शिंदे यांनी सांगितलं की, 'जत्रा २'साठी कथा तयार होती, पण ती दुसऱ्या सिनेमाशी मिळतीजुळती असल्याने थांबवली. आता नव्याने विचार करून 'जत्रा २' करण्याची तयारी आहे, पण त्यासाठी जुन्या उस्फुर्तपणाची गरज आहे.