‘हेरा फेरी ३’ चित्रपटासंबंधित वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, “सगळं काही…”
अक्षय कुमारने 'हेरा फेरी ३'बद्दल प्रतिक्रिया दिली आहे. परेश रावल यांनी चित्रपटातून एक्झिट घेतल्याने चाहत्यांमध्ये निराशा आहे. यावर अक्षयने पिंकव्हिलाशी बोलताना सगळं काही चांगलं व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, 'हेरा फेरी'च्या यशामागे अक्षय, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची जादू आहे. त्यामुळे परेश रावल पुन्हा चित्रपटात परतणार का? हे येत्या काळात कळेल.