पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीचा मोठा निर्णय, फसवणूक टळणार अन् उमेदवारांनाही होणार फायदा
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पूजा खेडकर प्रकरणानंतर आधार प्रमाणीकरणासह सुधारित परीक्षा पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर उमेदवारांना खाते तयार करणे, सार्वत्रिक नोंदणी, अर्ज भरणे आणि परीक्षा अर्ज या चार टप्प्यांतून नोंदणी करावी लागणार आहे. आधार प्रमाणीकरणामुळे पडताळणी प्रक्रिया सुलभ होईल. नवीन पोर्टलमध्ये १४ प्रमुख परीक्षांचा समावेश आहे. आयोगाने उमेदवारांना आधार प्रमाणीकरण निवडण्यास प्रोत्साहित केले आहे.