कनिष्क विमानातील बॉम्बस्फोटाची ४० वर्षे; कटात सहभागी ‘मी. एक्स’ आहे तरी कोण?
कनिष्क विमानातील बॉम्बस्फोटात ३२९ प्रवासी आणि क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. ही घटना २३ जून १९८५ रोजी आयर्लंडच्या किनाऱ्यावर घडली. आयर्लंडच्या किनाऱ्यापासून सुमारे १९० किमी अंतरावर हवेतच बॉम्बस्फोट होऊन ‘एअर इंडिया १८२’ हे विमान अटलांटिक महासागरात कोसळले होते. ही दुर्घटना भारतासाठी अनेकार्थाने महत्त्वाची आणि दु:खद होती. काल या दुर्घटनेला ४० वर्षं पूर्ण झाली.