आरसीबीसाठी वाईट बातमी! १७ हंगामात टॉस जिंकणाऱ्या संघाने जिंकली आहे ‘इतक्या’ वेळा ट्रॉफी
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या इतिहासानुसार, टॉस जिंकणाऱ्या संघाला अधिक फायदा होतो. १७ पैकी १० वेळा टॉस जिंकलेला संघ विजयी झाला आहे.