विराट इमोशनल होत असताना शशांक षटकार खेचत होता; पंजाबनं २ चेंडूंमुळे गमावला अंतिम सामना!
आयपीएलच्या १८व्या पर्वाचं विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं पटकावलं. अंतिम सामन्यात आरसीबीच्या विजयामुळे बंगळुरूमध्ये जल्लोष झाला. शेवटच्या षटकात जॉश हेझलवूडच्या पहिल्या दोन निर्धाव चेंडूंमुळे सामना आरसीबीच्या बाजूने फिरला. शशांक सिंहनं नंतरच्या चार चेंडूंमध्ये २२ धावा केल्या, पण पंजाबला फक्त सहा धावांनी पराभव पत्करावा लागला. विराट कोहलीच्या भावनिक क्षणांनीही चाहत्यांचं लक्ष वेधलं.