पंजाबसाठी मोठी झेप तर बंगळुरूसाठी काठावरचा संघर्ष! आयपीएल कधीच न जिंकलेले…
रविवारी झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आरसीबीने पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाबला हरवून अंतिम फेरी गाठली होती. दोन्ही संघांनी आजतागायत आयपीएलचे विजेतेपद मिळवलेले नाही. २०२५ च्या साखळी सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी १९ गुण मिळवले होते. प्लेऑफमध्ये आरसीबीने पंजाबला हरवले, पण पंजाबने मुंबई इंडियन्सला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.