व्यावसायिक सुशील केडिया यांनी मराठी शिकण्यास नकार देत राज ठाकरेंच्या मराठी भाषेच्या आग्रहावर टीका केली. त्यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीच्या पुण्यातील कर्मचाऱ्याचा पगार थकवल्यामुळे त्याने फूटपाथवर झोपून निषेध केला. सौरभने २९ जुलैपासून फूटपाथवर राहत असल्याचे पत्रात नमूद केले. आयटी कर्मचारी संघटना FITE ने सौरभला पाठिंबा दिला. टीसीएसने सौरभच्या अनियमित उपस्थितीमुळे पगार रोखल्याचे सांगितले. कंपनीने सौरभच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
मराठी अभिनेत्री समृद्धी केळकर सध्या 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेत शेतकऱ्याची भूमिका साकारत आहे. तिने सोशल मीडियावर मालिकेतील आगीच्या सीनच्या मागील क्षणांची झलक शेअर केली आहे. समृद्धीने शेतकऱ्यांच्या कष्टांबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणते, "शेतकरी संकटांना न घाबरता उभा राहतो. त्याच्या कष्टांना तोल नाही." तिच्या या व्हिडीओमधून तिच्या मेहनतीचं कौतुक होत आहे.
5 August Horoscope: श्रावण शुक्ल एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. यंदा पुत्रदा एकादशीला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग असे शुभ योग बनत आहेत, जे ४ राशींसाठी खूपच शुभ ठरू शकतात.
हिंदू धर्मात पुत्रदा एकादशीचं व्रत खूप खास मानलं जातं. हे व्रत त्या जोडप्यांसाठी विशेष असतं, जे मुलाच्या सुखापासून वंचित आहेत आणि मुलाची इच्छा ठेवतात. ज्यांना मुलं आहेत, त्यांना ही एकादशी दीर्घायुष्य, सौभाग्य आणि समृद्धी देते. पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा केल्याने हवी तशी इच्छा पूर्ण होते.
नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये शाहरुख खान, विक्रांत मॅसी आणि राणी मुखर्जी यांना सन्मानित करण्यात आले. मराठी चित्रपटांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र, टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी टीव्ही कलाकारांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की, कोविड काळातही टीव्ही कलाकारांनी अखंड काम केलं, पण त्यांचं कौतुक झालं नाही. त्यांनी सरकारकडे टीव्ही कलाकारांसाठीही सन्मानाची मागणी केली.
Urine Leakage: लघवी वारंवार व खूप वेगाने येणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होणे, याला ओव्हरअॅक्टिव्ह ब्लॅडर सिंड्रोम (Overactive Bladder – OAB) म्हणतात. ही अशी स्थिती असते, ज्यामध्ये व्यक्तीला अचानक लघवी होते आणि काही वेळा तर असेही होते की, टॉयलेटपर्यंत पोहोचण्याआधीच लघवी बाहेर येते. लघवीवर नियंत्रण न राहणे हे याचे सामान्य लक्षण आहे.
'पंचायत' फेम अभिनेता आसिफ खानच्या आरोग्याबद्दल अपडेट: आसिफ खानला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता तो बरा होत असून, त्याने धूम्रपानाची सवय सोडली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत, त्याने २१ दिवसांत धूम्रपान सोडल्याचं सांगितलं. तसेच, मित्रांना भेटण्याचं आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मालेगाव स्फोट आणि भगवा दहशतवादाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दहशतवादाचा रंग नसतो, तो कोणत्याही रंगाचा असू शकत नाही असे स्पष्ट केले. न्यायालयाने पुराव्याअभावी मालेगाव स्फोटातील सर्व आरोपींना मुक्त केले. अविमुक्तेश्वरानंद यांनी दोषी आरोपी सापडत नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आणि दहशतवादाच्या विरोधात शून्य सहनशक्तीचे धोरण अवलंबण्याचे आवाहन केले. हिंदी भाषेला मराठीच्या आधी राजभाषेची ओळख मिळाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भंडाऱ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात परिणय फुके यांनी "शिवसेनेचा बाप मीच" असे वक्तव्य केले, ज्यामुळे महायुतीत वाद निर्माण झाला आहे. परिणय फुके यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केले. शिवसेनेतील नेत्यांनी आणि मंत्र्यांनी परिणय फुके यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. दीपक केसरकर यांनी परिणय फुके यांचे विधान पक्षाचे नाही असे स्पष्ट केले. अंबादास दानवे यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.
सोनाली बेंद्रे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या टेलिव्हिजनवरील 'पती पत्नी और पंगा' कार्यक्रमात झळकत आहे. तिने नुकत्याच एका कार्यक्रमात तिच्या कर्करोगाच्या भीतीबद्दल सांगतिले. सोनालीने सांगितलं की, कर्करोग पुन्हा पसरण्याची भीती अजूनही आहे, पण ती नियमित स्कॅन करून काळजी घेते. तिने लोकांना वेळेवर चेकअप करण्याचं महत्त्वही सांगितलं.
बॉलीवूड दिग्दर्शक हंसल मेहता यांनी मुंबईतील वाढता कचरा, प्रदूषण आणि राहणीमानाबद्दल सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. परदेशातून परतल्यानंतर त्यांनी मुंबईची तुलना कोलंबोशी केली, जिथे अलीकडेच आर्थिक आणि राजकीय गोंधळ असूनही शहर स्वच्छ आणि नीटनेटके आहे. त्यांनी मुंबईतील रिअल इस्टेटच्या वाढत असलेल्या किमती आणि नागरी व्यवस्थेतील त्रुटींवरही टीका केली. त्यांच्या पोस्टला अनेकांनी समर्थन दिले आहे.
Shani Gochar: वैदिक ज्योतिषानुसार शनी देवाला कर्मानुसार फळ देणारे आणि न्याय करणारे देव मानले जाते. म्हणजेच शनी देव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. शनी देव अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात. त्याचबरोबर ते मधून मधून नक्षत्रही बदलतात.
सध्या शनी देव उत्तराभाद्रपद नक्षत्रात आहेत आणि ऑक्टोबर महिन्यात ते पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील. या नक्षत्राचे स्वामी गुरु ग्रह आहेत. त्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी भारतीय लष्कराबाबत केलेल्या अवमानकारक विधानावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सुनावलं आहे. डिसेंबर २०२२ मध्ये केलेल्या या विधानावरून राहुल गांधींविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. राहुल गांधींनी ही याचिका वाईट हेतूने करण्यात आल्याचा दावा केला होता, परंतु सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कठोर शब्दांत सुनावलं.
तेलुगू चित्रपटसृष्टीतील कामगारांनी ४ ऑगस्टपासून कामबंद संप पुकारला आहे. तेलुगू फिल्म कर्मचारी संघाने वेतनवाढीच्या मागणीसाठी हा निर्णय घेतला आहे. कामगारांच्या रोजंदारीत ३०% वाढ करण्याची मागणी आहे, जी तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. निर्मात्यांनी फक्त ५% वाढीचा प्रस्ताव दिला होता, जो नाकारला गेला. त्यामुळे अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट आणि वेबसीरिज ठप्प होण्याची शक्यता आहे.
Infosys चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याला ७० तास काम करण्याचं मत व्यक्त केल्यानंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. आता भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यावसायिक नेहा सुरेश यांनी आठवड्याला ८० तास काम करणं काही फार नसल्याचं विधान केलं आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करून दिवसाला १४ तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
मराठी मनोरंजन विश्वातील केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी यांच्या मैत्रीची चर्चा नेहमीच होते. केदार शिंदे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, काही गैरसमजांमुळे केदार आणि भरत नऊ महिने एकमेकांशी बोलले नव्हते. मात्र, नंतर ते पुन्हा एकत्र आले. केदार यांनी सांगितले की, त्यांच्या मैत्रीत कोणताही स्वार्थ नाही आणि त्यांचे व्यवहार नेहमीच चांगले राहिले आहेत.
मराठी अभिनेत्री अनुषा दांडेकरने 'बिग बॉस'च्या १९व्या सीझनमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने स्पष्ट केले की, ती कधीच 'बिग बॉस'च्या घरात जाणार नाही. अनुषाने सांगितले की, तिचे नाव नेहमी चर्चेत येते, पण निर्मात्यांनी कधीच संपर्क साधला नाही. तिला 'खतरों के खिलाडी'साठी विचारणा झाली होती, पण तिला त्यात रस नाही. ती लवकरच नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक विरुद्ध परप्रांतीय मुद्दा चर्चेत आहे. बेळगावमध्ये 'मराठा एकता एक संघटन' कार्यक्रमात आर्या गायकवाड या मराठी तरुणीचं भाषण व्हायरल झालं आहे. तिने परप्रांतीयांनी स्थानिकांच्या नोकऱ्या कशा हस्तगत केल्या, मराठा तरुण राजकारणात गुंतून कसा राहिला, आणि परकीय संस्कृती व भाषांचा मराठा समाजावर कसा प्रभाव वाढला यावर भाष्य केलं.
तमन्ना भाटिया बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमान खान आणि शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. तिनं सलमानसह 'दबंग' चित्रपटात आणि शाहरुखसह एका जाहिरातीत काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगतिलं आहे. सलमानच्या मेहनतीचं कौतुक करताना तिनं सांगितलं की, तो सलग दोन-अडीच तास रिहर्सल करत असे.
Romantic Zodiac Signs: ज्योतिषानुसार, खरं प्रेम करणं आणि रोमँटिक असण्यात ४ राशीचे लोक सगळ्यांत पुढे असतात. हे लोक प्रेमात खूप भावुक असतात, शुद्ध आणि दीर्घकाळ टिकणारं नातं टिकवतात, पार्टनरची काळजी घेतात. चला तर मग जाणून घेऊ या तीन राशी कोणत्या आहेत.
कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यात शाळेच्या मुस्लीम प्राध्यापकांना हटवण्यासाठी पाचवीच्या विद्यार्थ्याकरवी शाळेच्या पाण्याच्या टाकीत विषारी द्रव्य टाकल्याचा प्रकार घडला. या प्रकरणात श्रीराम सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. १२ विद्यार्थी आजारी पडले असून, सागर पाटील, नागनागौडा पाटील व कृष्णा मदार यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या धार्मिक द्वेषातून घडलेल्या कृत्याचा निषेध केला आहे.
Today Rashibhavishya Live Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे. तर महादेवाच्या कृपेने आज १२ राशींचा दिवस कसा जाणार आहे त्याबद्दल या लाईव्ह ब्लॉगमधून घेऊया...
Today Horoscope in Marathi 4 August 2025: आज ४ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण शुक्ल पक्षातील दशमी तिथी आणि सोमवार आहे. दशमी तिथी सकाळी ११ वाजून ४२ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर एकादशी तिथी सुरू होईल. ४ ऑगस्टचा पूर्ण दिवस आणि रात्र संपवून ५ ऑगस्टच्या सकाळी ७ वाजून २४ मिनिटांपर्यंत इंद्र योग असेल. ४ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजून १३ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र राहील, त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र सुरू होईल. तसंच आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे. चला तर मग जाणून घेऊया, या सोमवारी १२ राशींवर महादेव कशाप्रकारे करणार कृपा...
भारताची पहिली बुलेट ट्रेन सेवा लवकरच मुंबई-अहमदाबाद मार्गावर सुरू होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भावनगर येथील कार्यक्रमात ही माहिती दिली. ही सेवा सुरू झाल्यावर मुंबई-अहमदाबाद प्रवास फक्त २ तास ७ मिनिटांत होईल, असे ते म्हणाले.
शशांक केतकर, लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे. सध्या "मुरांबा" मालिकेमुळे चर्चेत आहे. मैत्री दिनानिमित्त दिलेल्या मुलाखतीत त्याने इंडस्ट्रीतील मैत्रीबद्दल सांगितले. शशांकने म्हटले की, इंडस्ट्रीत खूप मित्र नाहीत, पण अनुजा साठे, सौरभ गोखले, ओमकार कुलकर्णी आणि सुमित भोकसे हे त्याचे चांगले मित्र आहेत. त्याने आपल्या पत्नीला सर्वात चांगली मैत्रीण मानले आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील लिफ्ट अपघातातून बचावले आहेत. बीडमधील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये सहकाऱ्याला भेटायला गेले असताना रुग्णालयातील लिफ्ट ओव्हरलोड होऊन पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.
२०२२ च्या जून महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण बदल झाला. महाविकास आघाडी सरकार पडलं आणि एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केलं. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दोष देत, शिंदे हे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्याचं सांगितलं. शिंदेंनी उठाव केल्यावर फडणवीसांनी त्यांना पाठिंबा दिला. फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आणि सरकार स्थिर केलं.
Chanakya Niti: सुंदर महिलेशी लग्न करणे हे प्रत्येक पुरुषाचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न सगळ्यांसाठी चांगलं ठरेलच असं नाही. आचार्य चाणक्यांनी खूप वर्षांपूर्वी सुखी वैवाहिक जीवनासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या आजही लागू होतात. चाणक्य म्हणतात की, प्रत्येकासाठी सुंदर महिलेशी लग्न करणे योग्य नसते. अशाने त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. काही लोकांसाठी तर सुंदर महिलेशी लग्न करणे म्हणजे स्वतःचं आयुष्य नरकासमान करून घेणे आहे.
मुंबईच्या दादर येथील कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयावर अभिनेता अभिजीत केळकरने संताप व्यक्त केला आहे. कबुतरांमुळे श्वसनाचे आजार होतात हे सिद्ध झाल्याने मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला. काही रहिवाशांनी विरोध केला असला तरी अभिजीतने महापालिकेच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून लोकांना कबुतरांच्या समस्येचे गांभीर्य समजून घेण्याचे आवाहन केले आहे.
Budh Gochar 30 August Horoscope: ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला खास महत्त्व आहे. बुध देवाला राजकुमार असे म्हटले जाते. बुध देव बुद्धी, तर्क, संवाद, गणित, चातुर्य आणि मैत्री यांचे कारक मानले जातात. ३० ऑगस्ट रोजी बुध देव सिंह राशीत प्रवेश करणार आहेत.
बुधाच्या सिंह राशीत जाण्यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी २०२३ मध्ये लग्न केले. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले. लंडनमध्ये पुरस्कार समारंभात भेटल्यानंतर, परिणीतीने राघवबद्दल गूगलवर माहिती मिळवली. पहिल्या भेटीतच राघव चड्ढा तिच्या प्रेमात पडले. २४ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांनी लग्न केले आणि आता लवकरच आनंदाची बातमी देणार असल्याचे राघव यांनी सांगितले.