राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “…तर मनसेच्या आंदोलनाला सरकार जबाबदार असेल”
नव्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सक्ती करण्यात आली होती, ज्यात हिंदी भाषाही समाविष्ट होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याविरोधात आंदोलन केले आणि जनविरोधामुळे सरकारने हिंदी सक्ती मागे घेतली. मात्र, नव्या शैक्षणिक वर्षात हिंदी शिकवले जाण्याची शक्यता आहे. यावरून राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे आणि लेखी आदेश जारी करण्याची मागणी केली आहे.