“नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, प्रशांत दामले कुठे आहेत? मराठीवर हल्ले…”; राऊतांचा सवाल
सध्या हिंदी भाषेचा मुद्दा चर्चेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्यिकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. यावर संजय राऊत यांनी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे शत्रू म्हटले. त्यांनी मराठी भाषेला बळ देण्याची गरज व्यक्त केली. तसेच नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, प्रशांत दामले गप्प का आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. हिंदी सक्तीचा मुद्दा गुजरातमध्ये का नाही, असा खोचक सवालही त्यांनी केला.