“उद्धव आणि राज ठाकरे ज्या दिवशी एकत्र येतील…” ; संजय राऊत यांच्या वक्तव्याची चर्चा
संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ते म्हणाले की, दोन्ही भाऊ योग्य वेळी निर्णय घेतील आणि मराठी माणसांच्या मनात हीच इच्छा आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा रंगली आहे. राऊत यांनी भाजपावर टीका करत म्हटलं की, दोघे एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होईल.