तारा भवाळकर यांचं परखड मत; “चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना मातृभाषेतच शिक्षण दिलं जावं”
महाराष्ट्रात हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयावरून वाद सुरू आहे. नव्या शिक्षण धोरणानुसार पहिलीपासून त्रिभाषा सूत्र स्वीकारण्यात आले आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी पहिली ते चौथीपर्यंत फक्त मातृभाषेतून शिक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. राज ठाकरे यांनीही हिंदी भाषा लादण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. भवाळकर यांच्या मते, इतर भाषा पाचवीपासून शिकवणे योग्य आहे.