अमित शाहांच्या विधानावर संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी पंतप्रधान मोदींची गळाभेट घेतली असती, असे विधान केले. यावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी शाहांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि बाळासाहेब ठाकरेंनी मोदी-शाह यांना वाचवल्याचा पश्चाताप झाला असता, असे म्हटले. राऊतांनी शाहांवर गंभीर आरोप करत महाराष्ट्राच्या अपमानाचा निषेध केला.