भारत-पाकिस्तान तणावाचा मनोरंजन विश्वावर परिणाम, अनेक कलाकारांचे दौरे रद्द, तारक मेहता…
भारत-पाकिस्तान तणावामुळे मनोरंजन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक कलाकारांचे कार्यक्रम आणि चित्रपटांचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहेत. 'भूल चूक माफ' चित्रपटाचा थिएटर रिलीज रद्द करून ओटीटीवर १६ मे रोजी रिलीज होणार आहे. कमल हासन, सलमान खान, अरिजीत सिंग, उषा उत्थुप यांचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली असून फवाद खानच्या 'अबीर गुलाल' चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले आहे.