मुंबई किंवा ठाण्याहून कसे जाल समृद्धी महामार्गापर्यंत? किती वेळ आणि किमीचे अंतर आहे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन झालं. ७०१ किमी लांबीच्या या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास ८ तासांत शक्य होणार आहे. समृद्धी महामार्गावर १०० प्रकारच्या संरचना, ३२ मुख्य पूल, ३१७ लहान पूल, १८० ओव्हरपास, २२९ अंडरपास आणि २५ इंटरचेंज आहेत. महामार्गावर प्रवेश करण्यासाठी मुंबईकरांना आटगाव इंटरचेंजपर्यंत प्रवास करावा लागेल.