थायलंडमध्ये एका प्रियकराने प्रेयसीच्या घरावर हँड ग्रेनेड फेकल्याने स्वतःचाच मृत्यू ओढवून घेतला. प्रेयसीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर प्रियकराने तिला चर्चेसाठी बोलावले, पण नकार मिळाल्यावर त्याने हँड ग्रेनेड फेकला.
'बालिका वधू' फेम अविका गौरने तिच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीसोबत ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 'पती, पत्नी और पंगा' या शोमध्ये त्यांनी त्यांच्या लग्नाबाबत सांगितलं आणि या शोद्वारेच त्यांच्या लग्नाचं थेट प्रसारण होणार आहे. अविकाने तिच्या चाहत्यांसोबत हा खास क्षण साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. दोघे ३० सप्टेंबर २०२५ रोजी विवाह करणार आहेत.
Fatty Liver Symptoms in Women: आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे लोकांचे जीवन पूर्णपणे बदलले आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि अस्वस्थ जीवनशैली यांमुळे लोकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. चुकीचा आहार आणि व्यायामाची कमतरता यांमुळे फॅटी लिव्हर ही समस्या दिसून येत आहे.
राणी मुखर्जी लवकरच 'मर्दानी ३'मधून पोलिस अधिकारी शिवानी रॉयच्या भूमिकेत परतणार आहे. नवरात्रीच्या मुहूर्तावर या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी तो प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्सने सोशल मीडियावर पोस्टर शेअर केले आहे, ज्यात राणी मुखर्जी बंदूक घेऊन खंबीरपणे उभी आहे. प्रेक्षकांनी या घोषणेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
Shukra Gochar in November: ज्योतिषानुसार नवग्रहांपैकी शुक्र हा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. तो दैत्यांचा गुरु असून, धन-वैभव, सुख-समृद्धी, संपत्ती, प्रेम-आकर्षण आणि भोग-विलास यांचा कारक असतो. शुक्र काही कालावधीनंतर राशी बदलतो आणि त्याचा परिणाम १२ राशींवर नक्कीच होतो.
Budh Gochar after Navratri: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह साधारणपणे १ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात. बुध ग्रहाला वाणी, बुद्धी, तर्क, संवाद, गणित, चातुर्य, शेअर बाजार, अर्थव्यवस्था आणि मित्र यांचा कारक मानले जाते. म्हणूनच बुध ग्रहाच्या हालचालीत बदल झाला की त्याचा परिणाम या गोष्टींवर आणि सर्व राशींवर होतो.
Surya Budh Yuti 2 October: वैदिक ज्योतिषानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. आत्ता सूर्य आणि बुध कन्या राशीत आहेत. १५ सप्टेंबरला बुध कन्या राशीत गेला आहे आणि १७ सप्टेंबरला सूर्यही तिथे गेला आहे. सूर्य-बुधाची ही युती २ ऑक्टोबरपर्यंत राहील. कन्या राशीत राहून सूर्य-बुध काही राशींना चांगले परिणाम देतील. चला तर मग पाहू या ही युती कोणत्या राशींना फायदा देईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई येथे झालेल्या सुपर ४ फेरीतील सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेले १७२ धावांचे लक्ष्य भारताने १८.५ षटकात पूर्ण केले. सुनील गावसकर यांनी भारतीय खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणातील चुकांवर नाराजी व्यक्त केली. शिवम दुबेने ४ षटकात ३३ धावा देत २ विकेट घेतल्या, ज्यात फरहानची महत्त्वपूर्ण विकेट होती.
राज्यात मराठा, ओबीसी आणि बंजारा आरक्षणाच्या मुद्द्यावर वादळ असताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये हलबा महासंघाच्या कार्यक्रमात वक्तव्य केले. त्यांनी ब्राह्मण समाजाला आरक्षण नसल्याबद्दल परमेश्वराचे उपकार मानले. गडकरी म्हणाले की, बेरोजगारी ही मोठी समस्या आहे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमांची गरज आहे. गुणवत्तेचा विकास महत्त्वाचा असून, समाजातील सुशिक्षितांनी पुढाकार घ्यावा.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवा कार्यकारी आदेश जारी केला आहे. आता H-1B व्हिसाद्वारे परदेशी नागरिकांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांना (ज्यात बहुतांश IT कंपन्यांचा समावेश आहे) प्रत्येक कामगारासाठी दरवर्षी तब्बल १ लाख डॉलर्स भरावे लागणार आहेत. या निर्णयाचा मोठा फटका भारतीय आणि चिनी कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांना बसणार आहे. आतापर्यंत, H-1B व्हिसासाठी केवळ १,५०० डॉलर्सपर्यंतचे विविध प्रशासकीय शुल्क आकारले जात होते.
भोपाळमधील अभियंता पती-पत्नीने पाळीव प्राण्यांमुळे घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. पत्नीची मांजर आणि पतीचा कुत्रा यांच्यातील संघर्षामुळे त्यांच्या नात्यावर परिणाम झाला. कुटुंब न्यायालयाने त्यांना समुपदेशक केंद्रातून सल्ला घेण्याचा पर्याय दिला आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी निलेश साबळेने सांभाळली होती. भाऊ कदम यांनी एका मुलाखतीत निलेश साबळेबद्दल गौरवोद्गार काढले आणि त्याच्या आगामी सिनेमाबद्दल माहिती दिली. भाऊ कदम म्हणाले की, निलेश साबळे प्रामाणिक आहे आणि त्याच्या यशासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.
Surya Grahan Effects on Zodiac Signs: वर्षातील दुसरं आणि अखेरचं सूर्य ग्रहण २१ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता सुरू होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात याचा सूतक काळ लागू होणार नाही, कारण इथे याची छाया दिसणार नाही. त्यामुळे गर्भवती महिला किंवा इतर कोणालाही याच्या नकारात्मक परिणामाची भीती बाळगण्याची गरज नाही.
इरफान खान यांनी 'मकबूल' चित्रपटाच्या सेटवर ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या मजेमुळे संयम गमावल्याची आठवण दीपक डोब्रियाल यांनी सांगितली. एका भावनिक सीनमध्ये ओम पुरी यांच्या मजेशीर उच्चारांमुळे सीन वारंवार थांबत होता. इरफान खान यांचा संयम सुटला आणि त्यांनी शिवी दिली, पण लगेच माफी मागितली. यानंतर सेटवर गंभीर वातावरण निर्माण झाले आणि अखेरचा टेक यशस्वीपणे पूर्ण झाला.
एका ठिकाणी दडलंय सुमारे २ कोटी टन सोनं, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. कागदोपत्री या साठ्याची किंमत तब्बल २ क्वॉड्रिलियन डॉलरपेक्षा अधिक होऊ शकते. पण, त्यात एक अडथळा आहे. हे सोनं ढेकळं किंवा नगेटच्या स्वरूपात नाही. ते अतिसूक्ष्म कणांमध्ये विखुरलेलं आहे, हे सोनं इतकं बारीक आहे की, प्रत्यक्षात ते कधीच आपल्या आवाक्यात येऊ शकणार नाही… तरीदेखील प्रश्न कायम आहे, माहसागराच्या लाटांच्या तळाशी इतकं सोनं असताना, भविष्यातील तंत्रज्ञानाच्या मदतीने ते काढणं शक्य होईल का?
'दबंग' चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी सलमान खानच्या फिटनेसवर टीका केली आहे. 'बॉलिवूड ठिकाणा' या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिनवने सलमान VFX द्वारे स्वत:ची शरीरयष्टी सुदृढ दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं. तसेच, स्टंट सीनसाठी बॉडी डबल वापरल्याचंही सांगितलं. अभिनवच्या या नव्या आरोपांमुळे सलमान आणि त्यांच्यातील वाद पुन्हा चर्चेत आले आहेत.
अनुराग कश्यपने विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाबद्दल मत व्यक्त केलं आहे. त्याने सांगितलं की, चित्रपटातील त्रासदायक प्रसंगांमधून भावना निर्माण करण्याचा प्रयत्न त्याला योग्य वाटला नाही. अनुरागने हा चित्रपट मुख्यतः मित्र विनीत कुमार सिंहसाठी पाहिला होता. त्याला चित्रपट भावनिकदृष्ट्या त्रासदायक वाटला आणि तो पूर्ण पाहू शकला नाही. अनुराग सध्या 'निशांची' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
सारनाथ स्तूपाला २०२५-२६ या वर्षात जागतिक वारसा यादीत स्थान मिळावं, याकरिता भारताने नामांकन दिलं आहे. म्हणूनच युनेस्को पथकाच्या प्रस्तावित सारनाथ दौऱ्याआधी भारतीय पुरातत्त्व विभाग या स्थळाची माहिती देणारा नवीन फलक बसवणार आहे. या फलकावर असलेली माहिती दुरूस्त करण्यात आली आहे. यापूर्वी या पवित्र बौद्ध स्थळाचं जतन करण्याचं आणि या स्थळाचं महत्त्व १७९८ साली उघड करण्याचं श्रेय ब्रिटिशांना देण्यात आलं होतं.
Blood in Cough: खोकल्यात रक्त येणे ही कधीच साधी गोष्ट नसते. खोकल्याबरोबर रक्त दिसल्याने कुणालाही घाबरायला होऊ शकतं. वैद्यकीय भाषेत याला हेमोप्टिसिस म्हणतात. बरेच लोक याकडे साधा खोकला किंवा घशाची खवखव म्हणून दुर्लक्ष करतात, पण हे फुफ्फुसाशी संबंधित गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. टीबी, फुफ्फुसाचा कॅन्सर, ब्रॉन्किएक्टेसिस आणि पल्मोनरी एम्बोलिझम ही खोकल्यात रक्त येण्याची मोठी कारणे असू शकतात. वेळेवर उपचार न केल्यास हे जीवघेणेही ठरू शकते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एकीकडे पंतप्रधान मोदींशी मैत्री दाखवत असताना, दुसरीकडे भारताविरोधात निर्णय घेत आहेत. त्यांनी एच-१बी व्हिसावर वार्षिक १ लाख डॉलर्सचे शुल्क लावण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे भारतीय आयटी कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ शकते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर उपरोधिक टीका करत, ट्रम्प भारताविरोधात शांतपणे लढत असल्याचा आरोप केला आहे.
भाऊ कदम यांनी 'चला हवा येऊ द्या' या शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यांनी नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये त्यांच्या एका चाहतीचा किस्सा सांगितला. ती बाई भाऊ कदम यांची मोठी फॅन होती आणि तिने देवाच्या बाजूला भाऊ कदम यांचा फोटो लावला होता. भाऊ कदम यांनी तिच्याशी संपर्क साधून तिला शोच्या हजाराव्या एपिसोडला बोलावलं. त्यांच्या या लोकप्रियतेमुळे त्यांना महाराष्ट्रभरात चाहतावर्ग आहे.
Surya Grahan Time: वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण झालं आहे आणि आता सूर्यग्रहण होणार आहे. ही एक आकाशातील घटना आहे. पण ज्योतिष आणि धर्म या दोन्हींत याला खूप महत्त्व आहे.
धार्मिक दृष्टीने पाहिल्यास, सूर्यग्रहण तेव्हा होते जेव्हा राहू किंवा केतू सूर्याला झाकतात. त्या वेळी सूर्यदेव त्रस्त होतात. सूर्यग्रहणात जर सूतक काळ असेल, तर लग्न, शुभ कामे होत नाहीत आणि मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात. चला तर मग जाणून घेऊया वर्षातील शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहण कोणत्या वेळी लागेल आणि सूतक काळ लागू होईल की नाही…
बॉलीवूड दिग्दर्शक अभिनव कश्यपने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. 'दबंग' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला आणि चित्रपट यशस्वी झाल्यानंतर श्रेय काढून घेण्यात आले. अभिनवने सांगितले की, ५१ लाख रुपये थकले होते आणि धमक्या मिळाल्या. १५ वर्षांपासून खान कुटुंबाने त्याच्याशी संपर्क साधलेला नाही.
Navratri Lucky Zodiac Signs: हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खास महत्व आहे. या वर्षी नवरात्री दरम्यान अनेक शुभ योग तयार होत आहेत. त्यामुळे काही राशीच्या लोकांवर आई दुर्गा आणि आई लक्ष्मीची खास कृपा होऊ शकते. शारदीय नवरात्री २२ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत आहे आणि १७ ऑक्टोबर पर्यंत तिथेच राहणार आहे. अशा वेळी मकर राशीत असलेल्या यमासोबत संयोग करून नवपंचम राजयोग तयार होत आहे. या योगामुळे तीन राशीच्या लोकांना जास्त फायदा मिळू शकतो. चला जाणून घेऊ या त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…
कॉमेडियन कपिल शर्मा सध्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मुळे चर्चेत आहे. शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये 'हेरा फेरी' चित्रपटातील ‘बाबुराव गणपतराव आपटे’ हे पात्र परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप निर्माता फिरोज ए. नाडियाडवाला यांनी केला आहे. त्यांनी नेटफ्लिक्सला २५ कोटींची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये संबंधित भाग हटवणे, भविष्यात पात्राचा वापर न करणे, माफीनामा आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेतील इमिग्रेशन आणि व्हिसा धोरणात बदल करत H-1B व्हिसासाठी शुल्क वाढवले आहे. आता कंपन्यांना प्रतीवर्षी १ लाख डॉलर म्हणजेच ८८ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. या निर्णयाचा फटका भारतीय आयटी कामगारांना बसू शकतो.
Surya Grahan Bad Impact to Zodiac Signs: वैदिक पंचांगानुसार यावर्षाचं दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रविवारी लागणार आहे. सगळ्यात खास गोष्ट अशी की या दिवशी सर्वपितृ अमावस्या आहे आणि याचदिवशी पितृपक्ष संपणार आहे. अशातच यादिवशी लागणारं सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचे मानलं जाणार आहे.
Drinking Empty Stomach: सोशल मीडियावर दारूशी संबंधित पोस्ट पाहिल्या तर तुम्हाला कळेल की किती लोकांनी उपाशी पोटी दारू प्यायलाचा अनुभव शेअर केला आहे. काहीजणांसाठी दारू पिणं हे सुट्टीतल्या खास नाश्त्यासारखं असतं, तर काहींसाठी कमी दारू पिऊनही पटकन नशा येण्यासाठीचा स्वस्त उपाय. पण, अशा वेळी लोकांना काही मिनिटांतच नशा का होते आणि शरीरात नेमकं काय घडतं ते जाणून घेऊया…
कोकणातील राखणदार हा वेतोबा, भैरोबा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. हातात घुंगरू असलेली काठी, पायात चामड्याची चप्पल, खांद्यावर घोंगडी असे काहीसे राखणदाराचे रूप असते. भक्ती, शक्ती आणि भीती तसेच गूढता असे आगळे वेगळे समीकरण आपल्याला राखणदाराच्या संकल्पनेत पाहायला मिळते. त्याच निमित्ताने कोकणातील राखणदाराची हजारो वर्षांची परंपरा नेमकं काय सांगते? याचा घेतलेला आढावा.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांमध्ये ७ महिन्यांत १४.७१ लाख मतदारांची वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक वाढ झाली असून, पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. मतदारांच्या स्थलांतरामुळेही वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ पर्यंतच्या अपडेटेड याद्या वापरण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता.
Skin Cancer Treatment: ड्रायफ्रूट्स आणि बिया खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे फक्त आरोग्य चांगले राहते असे नाही, तर अनेक आजारांपासूनही बचाव होतो. अलीकडे झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की रोजच्या आहारात नट्स आणि बियांचा वापर केल्याने फक्त आरोग्यच नाही तर त्वचेलाही कॅन्सरपासून वाचवता येते. कारण या खाद्यपदार्थांमध्ये असलेले व्हिटॅमिन B3 (ज्याला नायसिन किंवा निकोटिनामाइड म्हणतात) त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवते आणि स्किन कॅन्सरचा धोका कमी करते.