आजचा २६ नोव्हेंबरचा ऐतिहासिक दिवस आहे. ७० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपण विधीवत संविधान स्वीकारले होते. संविधान आमच्यासाठी सर्वात मोठा ग्रंथ आहे. भारताचे संविधान आपल्याला नागरीकांना असलेले अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करुन देते. हा आपल्या संविधानाचा विशेष पैलू आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते संविधान दिनानिमित्त संसदेत बोलत होते.