शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदींचे कौतुक केल्यावर लगेचच शरद पवार यांना ‘शिवसेना हा वचन पाळणारा मित्र आहे.’ असे म्हणावे लागले. मित्रावर जेव्हा विश्वास नसतो तेव्हाच मित्र वचन पाळणारा आहे असं जाहीरपणे सांगावे लागते, असा टोला भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी लगावला आहे.