देशात अनेक विकास प्रकल्प आले आणि या प्रकल्पांसोबतच स्थानिकांच्या विस्थापनाचा प्रश्नही उभा राहिला. अनेक प्रकल्पांमध्ये विस्थापित नागरिक आणि सरकारमध्ये संघर्ष पहायला मिळाला. कधी विस्थापितांनी मोबदला न मिळाल्याची तक्रार केली, तर कधी तुटपुंजा मोबदला दिल्याचा आरोप झाला. मात्र, विस्थापितांच्या लढ्यात नर्मदा बचाव आंदोलनाने यशस्वी संघर्ष करत सरकारच्या ६ लाख नुकसान भरपाईऐवजी ६० लाख मिळवले. नेमकं हे कसं झालं? त्यांच्या संघर्षाला यश कसं आलं? त्यांनी कोणकोणत्या मार्गाने लढा दिला याचा आढावा घेणारा हा खास एपिसोड…