CM Shinde on SC : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर शिंदे म्हणाले, ‘घटनाबाह्य म्हणणारेच आता कालबाह्य झाले’
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सुनावला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घेतलेल्या विविध निर्णयांवर न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवलं. राज्यपालांनी केलेल्या चुका, विधानसभा अध्यक्षांच्या चुका आणि स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची केलेली घाई यावर मत नोंदवलं. यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली