प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक, आमदार बच्चू कडू यांचा गेल्या वीस वर्षांपासून दिव्यांगणासाठी लढा सुरु होता. अखेर आमदार बच्चू कडू यांना शासनाकडून मंत्रीपदाचा दर्जा जाहीर करण्यात आला. यासाठी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांची निवड करण्यात आली आहे. शासनाने परिपत्रक काढून बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा हा दर्जा जाहीर केला आहे. याबद्दल बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.