आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांना ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या सांगितल्या आहेत. आम्हाला देशाचे पुन्हा तिसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करायचे आहे. जास्तीत जास्त जागा या महायुतीला मिळाल्या पाहिजे. प्रत्येकाचा मान सन्मान हा सांभाळला जाईल. याच्यातून चांगलं कसं घडेल याबद्दलचं काम आमच्याकडून होईल”