मुंबईत आयोजित केलेल्या वेव्हज २०२५ या परिषदेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते. त्यांच्या उपस्थित मुंबईला नवी चित्रनगरी मिळाली आहे. या कार्यक्रमात अनेकविध कलाकारांनीही हजेरी लावली. एकीकडे काश्मीरमध्ये सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नट-नट्यांबरोबर वेळ घालवत असल्यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे.