Rajnath Singh Reaction On Pahalgam Attack: भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सनातन संस्कृती जागरण महोत्सवात सहभाग घेतला होता. दिल्लीच्या या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. मी देशाचा संरक्षण मंत्री आहे, त्यामुळे माझं हे कर्तव्य आहे की मी आपल्या सैनिकांसह आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करेन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशाला जे वाटतं आहे ते होणारच असं म्हणत राजनाथ सिंह यांनी या कार्यक्रमात पाकिस्तानला इशारा दिला आहे.