Heavy Rain Alert for Mumbai, Raigad, Thane & Palghar : गेल्या २४ तासांपासून राज्यात ठिकठिकाणी संततधार तर काही भागांमध्ये चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, बारामती व कर्जत शहरातील काही रस्त्यांवर नदीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तर, ठाणे व पुण्यातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांना रस्त्यावरून वाहनं चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस सुरू राहील असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.