बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रार्थनेची परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ आज दोन्ही शिवसेनेकडून ‘घंटा नाद’ आंदोलन केलं जात आहे. हे आंदोलन बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली वर्षानुवर्षे सुरू आहे. शिवसेनेची फूट झाल्यानंतर आता दोन्ही गट दरवर्षी मोठ्या संख्येने मंदिरात जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आजच्या दिवशी मुस्लिम बांधव किल्ला परिसरात नमाज अदा करत असल्यानं संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांकडून किल्ल्याकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसंच लाल चौकी परिसरात पोलीस बॅरिगेड्स लावून आंदोलनकर्त्यांना थांबवण्यात येत आहे.