scorecardresearch

Page 6738 of मराठी बातम्या News

राणेंची स्वपक्षीयांवर आगपाखड

विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव वर्मी लागलेले काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी मौन सोडून स्वपक्षीयांवरच तोंडसुख घेतले.

किमान संख्या नसली तरी मंत्रिमंडळाचे निर्णय कायदेशीरच

राज्यघटनेतील तरतुदीनुसार किमान १२ सदस्य आवश्यक असताना त्याहून कमी सदस्यांचे राज्य मंत्रिमंडळ असले तरी त्यांना निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत,…

दिल्लीत फेरनिवडणूक

केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिल्याने तब्बल आठ महिन्यांपासून राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या दिल्लीत मंगळवारी फेरनिवडणुकीबाबत शिक्कामोर्तब झाले.

इबोलावरून पनवेलमध्ये गलबला!

जगभरात कहर माजवलेल्या आणि हजारो लोकांचे प्राण घेतलेल्या इबोला आजाराचा संशयित रुग्ण पनवेलमध्ये आल्याच्या नुसत्या वार्तेने मंगळवारी अख्ख्या गावभर अक्षरश…

दुसरी घंटा झाली, अर्जाची प्रतीक्षा संपली

‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर राज्यभरातील सर्वच महाविद्यालयांमधील सर्जनशील लेखकांच्या लेखण्या सरसावल्या असतील.. या लेखण्यांतून उत्तमोत्तम…

बॅलार्ड इस्टेट ते वडाळा स्वतंत्र मार्गिकेचा प्रस्ताव

दाराला लोंबकळत, खच्चून भरलेल्या गर्दीत स्वतला कोंबत पनवेल-वाशीवरून मुंबई गाठणाऱ्या हार्बरवरील प्रवाशाला दिलासा देणारी योजना आखण्यात आली आहे. हार्बर मार्गावर…

वाढीव रक्तशुल्काचेही उल्लंघन

रक्तावरील सुरक्षा चाचण्यांचे दर निश्चित नसल्याची ढाल पुढे करत गेली अनेक वर्षे एका पिशवीची किंमत पाच हजार रुपयांपर्यंत लावणाऱ्या खासगी…

मध्य रेल्वेचा बट्टय़ाबोळ सुरूच!

ऐन गर्दीच्या वेळी कोणता ना कोणता तांत्रिक बिघाड करून मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवण्याची दैनंदिन परंपरा मध्य रेल्वेने मंगळवारीही कायम राखली.

आणखी एक वादळ येऊ घातलंय..!

आंध्र प्रदेशवर थडकलेले हुदहुद आणि गुजरात किनाऱ्यावर पोहोचण्याआधीच विरलेले निलोफर या वादळांनंतर आता आणखी एक वादळ येऊ घातले आहे. बंगालच्या…

गोविंदांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मंडळे धास्तावली!

मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या थरात १८ वर्षांखालील व्यक्तीच्या सहभागास केलेल्या मनाईवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर दहीहंडी उत्सव समन्वय समितीच्या तोंडचे…

‘स्वच्छ भारत अभियाना’त सहकार्य न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

मुंबईमध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी सहकार्य न करणाऱ्या हॉटेल आणि दुकान मालकांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.