अतुल लांडे
विविध स्तरांवरून होणाऱ्या विरोधानंतरही राज्य लोकसेवा आयोगाने २०२३ पासून राज्यसेवा परीक्षा नवा अभ्यासक्रम आणि नव्या पद्धतीनुसारच घेतली जाणार आहे, असे अधोरेखित केले आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील बदलांच्या अंमलबजावणीसाठी आयोगाने अनेक धोरणात्मक बदल करणे अपेक्षित आहे. नियोजित बदलांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी आयोगाने काय केले पाहिजे, याविषयी मागील लेखात आपण चर्चा केली. चर्चेचा पुढील भाग या लेखात पुढे पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रश्नपत्रिकांचा दर्जा
प्रश्नपत्रिकांचा दर्जा टिकवून ठेवणे आयोगाला आजही अतिशय अवघड जात आहे. प्रश्नपत्रिकांत बऱ्याचदा चुका असतात. कधी प्रश्नच चुकीचे असतात. कधी मराठी आणि इंग्रजी भाषांतर वेगवेगळे असते. त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर काही प्रश्न रद्द करावे लागतात. बहुपर्यायी परीक्षेत प्रत्येक प्रश्न एक किंवा दोन गुणांचा असतो. लेखी परीक्षेत प्रश्न १०/२० गुणांचे असू शकतात. तिथे एखादा प्रश्नसुद्धा रद्द करणे शक्य होणार नाही. विचार करा, निबंधाच्या प्रश्नपत्रिकेत भाषांतर करताना एका शब्दाची चूक झाली तर संपूर्ण पेपरच रद्द करणार का?

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc mantra state services exam new pattern quality of question papers amy
First published on: 04-08-2022 at 00:07 IST