अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी २०२३ च्या चौथ्या आणि अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाहुण्यांनी उस्मान ख्वाजाच्या शतकाच्या जोरावर ४ गडी गमावून २५५ धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर क्रिकेटच्या गल्लीबोळात रोहित शर्माच्या कर्णधारपदाची चर्चा सुरू झाली. यादरम्यान दिनेश कार्तिकनेही रोहितच्या कर्णधारपदावर दोन प्रश्न उपस्थित केले. दिवसाच्या शेवटच्या ९ षटकांसाठी नवीन चेंडू घेण्याचा निर्णय योग्य नव्हता, असे डीकेचे म्हणणे आहे, तर तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून संघात समाविष्ट करण्यात आलेल्या अक्षर पटेलचीही वकिली केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिनेश कार्तिकने क्रिकबझला सांगितले की, “दिवसाच्या मोठ्या भागासाठी त्याचे कर्णधारपद चांगले होते. फिल्ड प्लेसिंगमध्ये ते सक्रिय होते. त्याने सिली पॉइंट, शॉर्ट लेग ठेवण्याची नेहमीची पद्धत वापरली नाही. त्याने गोष्टी सातत्याने घट्ट ठेवल्या. पहिल्या तासात काही धावा झाल्या पण त्यानंतर त्याला २ विकेट्स मिळाल्या. मग मध्यभागी त्याने स्मिथ आणि ख्वाजा विरुद्ध टाईट क्षेत्ररक्षण केले आणि त्यांना सहज चौकार मारू दिला नाही, परंतु मला वाटते की त्यावेळी नवीन चेंडू घेणे हा योग्य निर्णय नव्हता. नंतर त्याने मागे वळून बघायला हवे होते की आपण नवीन चेंडूने फक्त ४-५ षटके टाकू शकलो असतो का? त्याने विचारायला हवे होते की मी ९ षटके टाकायला हवी होती का?”

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: उस्मान ख्वाजाचे भारताविरुद्ध पहिले द्विशतक हुकले! भारताच्या गोलंदाजीची पिसे काढत ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

कार्तिकने अक्षरबद्दलही प्रश्न उपस्थित केले

नवीन चेंडू घेण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर दिनेश कार्तिकने अक्षर पटेलला तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून खेळवण्याच्या आणि त्याला जास्त गोलंदाजी न करण्याच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला, “अक्षर पटेलबद्दल बोलायचे झाले तर तो रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा एक अतिशय मनोरंजक केस स्टडी बनला आहे. भारताकडे अश्विन-जडेजा देखील आहेत, ज्यांना ते मोठ्या प्रमाणात षटके देत आहेत, परंतु फिरकी त्रिकूटमध्ये मिश्रण आणण्यासाठी अक्षर कमी वापरत आहे आणि ते त्यांना गोलंदाजी करत नाहीत. अक्षर नवीन चेंडूने गोलंदाजी करताना आम्ही पाहिले आहे आणि त्याने चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही चेंडू बदललात, तेव्हा तुम्ही त्यासह गोलंदाजी करू शकत नाही का? त्याला बाउंस आहे आणि त्याची उंचीही चांगली आहे, त्यामुळे त्याला त्याच्या घरच्या परिस्थितीत गोलंदाजी करताना पाहणे खूप छान वाटले असते.”

हेही वाचा: IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या मुख्य कर्णधारावर दुखा: चा डोंगर! पॅट कमिन्सच्या आईचे निधन, ऑसी संघाने काळी पट्टी बांधून व्यक्त केला शोक

रोहितला कर्णधार म्हणून रणनीती बदलावी लागेल

पुढे बोलताना कार्तिक म्हणाला की, “कर्णधार म्हणून तुम्हाला हेही लक्षात ठेवावे लागेल की जेव्हा तुमच्याकडे तीन फिरकीपटू असतात तेव्हा ते कठीण होते. फिरकीपटू लांबलचक स्पेल टाकतात, जोपर्यंत गोष्टी तुमच्या बाजूने असतात, त्यावर कोणी बोलत नाही, पण संघ हरला की तुमच्या गोष्टी उघड्यावर येतात. यासाठी मी रोहितला जास्त दोष देणार नाही, पण रोहितला कर्णधार म्हणून आपल्या फिरकी गोलंदाजांना मदत करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करावा लागेल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus he didnt take the right decisions dinesh karthik was upset with rohit sharmas strategies in the fourth test avw