भारत हा विविध धर्मांचा देश आहे. या धर्मांमध्ये अनेक प्रथा आणि परंपरा आहेत. विशेषतः हिंदू धर्मात. हिंदू धर्म हा असा धर्म आहे ज्यामध्ये आज प्रत्येक शुभ कार्य किंवा कोणत्याही विशेष प्रसंगाची प्रथा आहे. पण या सर्व कामांमुळे आपल्या शरीराला किती फायदा होतो हे तुम्हाला माहीत आहे. त्याचबरोबर त्याचा आपल्या मनावरही जास्त परिणाम होतो. हिंदू धर्मात एक गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे स्त्रीचा सोळा श्रृंगार. जो जगभर प्रसिद्धही आहे. या सोळा श्रृंगारात कपाळाच्या टिकलीपासून ते पायात घातलेल्या जोडवीपर्यंत असतात. प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे महत्त्व आहे. परंपरांच्या दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्वही आहे. जाणून घ्या पायाच्या बोटाला घातल्या जाणाऱ्या जोडवीच काय आहे वैज्ञानिक कारण.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जोडवीला बरेच लोक याला केवळ लग्नाचे प्रतीक मानतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे. क्वचितच तुम्हाला माहित असेल की ते परिधान करणे थेट त्यांच्या गर्भाशयाशी संबंधित आहे. शास्त्रामध्ये असे मानले जाते की पायाच्या बाजूपासून दुसऱ्या बोटात एक विशेष नस असते जी गर्भाशयाला जोडलेली असते. हे गर्भाशयावर नियंत्रण ठेवते आणि रक्तदाब संतुलित करून निरोगी ठेवते.

(हे ही वाचा: कलिंगड खाण्याची योग्य वेळ काय? चुकीच्या वेळेचा किडनीवर होऊ शकतो परिणाम)

दोन्ही पायात चांदीची जोडवी धारण केल्याने स्त्रियांची मासिक पाळी नियमित होते, असे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे महिलांना गर्भधारणा करणे सोपे जाते. चांदी हा विजेचा चांगला वाहक मानला जातो. हे पृथ्वीवरून मिळालेली ध्रुवीय ऊर्जा खेचून संपूर्ण शरीरात प्रसारित करते, ज्यामुळे महिलांना ताजेतवाने वाटते.

(येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. )

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know the scientific reason behind women wearing jodavi in foot dharm ttg