८ मेच्या ‘लोकरंग’मधील गिरीश कुबेर यांचा ‘पर्यावरणाचा विवेक’ हा लेख वाचला. मी एक सनदी यंत्र अभियंता आहे आणि माझ्या अभियांत्रिकी ज्ञानावर आधारित काही मुद्दे येथे मांडू इच्छितो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातील बहुतेक औष्णिक ऊर्जा प्रकल्प जुन्या तंत्रज्ञानावर आधारित उप-निर्णायक बाष्पक (सब-क्रिटिकल बॉयलर) वापरतात. (ज्यात २२५ किलो/ सेमी^२ पेक्षा कमी दाब असतो.) त्यामुळे त्यांची औष्णिक कार्यक्षमता सुमारे २० ते कमाल ३० टक्के आहे. (बॉयलरची औष्णिक कार्यक्षमता म्हणजे एक किलो कोळसा बॉयलरमध्ये टाकल्यानंतर त्या एक किलो कोळशाच्या जाळण्याने निर्माण होणारी किती ऊर्जा विजेमध्ये रूपांतरित होते, ते.) थोडक्यात, कोळसा जाळल्याने निर्माण होणारी ७० ते ८० टक्के ऊर्जा कोळसाआधारित ऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणीच वातावरणात मिसळते. (ही ऊर्जा उच्च तापमानाच्या धुरामधून, बाष्पकातून, हवेत होणाऱ्या उष्णतेच्या उत्सर्जनामधून, गरम राखेतून आणि जनित्र/ टर्बाइनमधून बाहेर पडणारी वाफ आणि पाणी इत्यादीतून वातावरणात सोडली जाते.) या कारणामुळे औष्णिक विद्युत केंद्राजवळील वातावरणीय तापमान हे लगतच्या परिसरातील तापमानापेक्षा २ ते ३ डिग्री सेंटीग्रेड जास्त असते.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokrang reader reaction on girish kuber article zws
First published on: 22-05-2022 at 01:05 IST