महाराष्ट्रातील लोक उद्योगी व मेहनती आहेत आणि हीच त्यांची खरी ताकदआहे. प्रगती आणि विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र नेहमीच पुढे जात राहील, असा विश्वास राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी व्यक्त केला.  
संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राज्यपाल बोलत होते. आपण सर्वानी हातात हात घालून प्रगतीशील व धडाडीचे महाराष्ट्र राज्य निर्माण करू या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, महापौर सुनिल प्रभू, मुख्य सचिव जे. एस. सहारीया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनादिनामित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी यांनी हुतात्मा स्मारकास आदरांजली वाहिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra ahead in progress governor