नाशिक : येथील शंकराचार्य न्यास आणि संस्कार भारती यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त अनोख्या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील ४० कलाकारांनी प्रदर्शनात सहभाग नोंदविला. वेगवेगळय़ा क्षेत्रांतील मान्यवर, स्वातंत्र्यसेनानी, अयोध्येतील राम मंदिर, गोदाघाट असे देशाचे आणि नाशिकचे महत्त्व सांगणाऱ्या रांगोळय़ांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. १८ ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन सर्वासाठी खुले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गंगापूर रस्त्यावरील शंकराचार्य संकुल येथे आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, ज्ञानेश सोनार आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत झाले. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शंकराचार्य न्यासने संस्कार भारतीच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरवले आहे. त्यासाठी देशभरातून ४० रांगोळी कलाकार दोन दिवस नाशिकमध्ये वास्तव्याला आले. त्यात महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांतील तसेच गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, हैदराबाद या ठिकाणांहून आलेल्या कलाकारांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून देशाची शक्तिस्थाने रेखाटली. ५०० किलोहून जास्त रांगोळी वापरून ४० रांगोळय़ा साकारण्यात आल्या. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि भारत देशाच्या प्रगतीसाठी ज्यांचे बहुमूल्य योगदान लाभले, त्याची चित्रे या कलाकारांनी रेखाटली आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unique rangoli exhibition on the 75 anniversary of independence zws
First published on: 17-08-2022 at 00:44 IST