उरण : वादळीवाऱ्यामुळे समुद्रात धोक्याचा इशारा देण्यात आल्याने मागील आठवडाभर मुंबई ते उरणदरम्यानची जलसेवा बंद होती. ती सुरू होत नाही तोच मंगळवारी पुन्हा एकदा वातावरणातील बदलामुळे बंद करण्यात आली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
उरणच्या मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का या दोन बंदरांच्या दरम्यान जलसेवा दिली जात असून पावसाळ्यातही ही सेवा सुरू असते. परंतु मागील आठवड्यात हवामान विभागाने वर्तविलेल्या अनुमानानुसार वादळी वारे वाहणार असल्याने समुद्रात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला होता. त्यामुळे ही जलसेवा बंद करण्यात आली होती. ती शनिवारी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. मात्र मंगळवारी हवामानात बदल झाल्याने ही सेवा पुन्हा एकदा बंद करण्यात आली असल्याची माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली आहे.
First published on: 16-08-2022 at 22:50 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water transport from uran to mora closed again due to climate change zws