पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीतर्फे महाराष्ट्र स्टार्टअप आणि नावीन्यता यात्रा सुरू करण्यात आली. ३० ऑगस्टपर्यंत सर्व तालुक्यांमध्ये यात्रा जाणार आहे. याद्वारे उत्कृष्ट नवकल्पनांच्या सादरीकरण स्पर्धेतील जिल्हा स्तरावरील विजेत्याला २५ हजार रुपये, विभागस्तरावरील सर्वोत्कृष्ट उद्योजकाला विभागाचा स्टार्टअप हिरो पुरस्कार आणि विभागीय सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिकेला प्रत्येकी एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दोन फिरत्या एलईडी डिस्प्ले व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून यात्रेची सुरुवात केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त वर्षा उंटवाल-लोढा, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागीय सहसंचालक चंद्रकांत निनाळे, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे आदी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra innovation and startup yatra innovation presentation competition pune print news zws
First published on: 18-08-2022 at 01:27 IST