ऑस्ट्रेलियाला जाणारे तीन भारतीय तरुण इराणमध्ये बेपत्ता; कुटुंबियांकडून अपहरण झाल्याचा दावा
पंजाबमधील संगरूर, होशियारपूर आणि एसबीएस नगर येथून इराणला गेलेले तीन भारतीय बेपत्ता झाले आहेत. हुशनप्रीत सिंग, जसपाल सिंग आणि अमृतपाल सिंग हे तिघे १ मे रोजी तेहरानमध्ये उतरल्यानंतर लगेचच बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा दावा केला असून १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. भारतीय दूतावासाने इराणी अधिकाऱ्यांकडे तातडीने शोध घेण्याची विनंती केली आहे.