भाजपा खासदाराचे पहलगाम हल्ल्यावर वादग्रस्त विधान; विधवा महिलांचा उल्लेख करत म्हणाले…
भाजपाचे राज्यसभा खासदार रामचंद्र जांगरा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी महिलांनी लढायला हवे होते असे म्हटले. अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. त्यांच्या विधानावर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने टीका केली आहे.