‘ई साला कप नामदे’चा जयघोष यंदा उतरला सत्यात, RCB चा मंत्र असलेल्या वाक्याचा अर्थ काय?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने आयपीएल २०२५ ची ट्रॉफी जिंकून 'इ साला कप नामदे'चा नारा सत्यात उतरवला आहे. १८ वर्ष संघाबरोबर राहिलेल्या विराट कोहलीसह आरसीबीने अखेर यश मिळवलं. 'इ साला कप नामदे' म्हणजे 'यावर्षी कप आमचा आहे' हा कन्नड भाषेतील नारा आहे, जो आरसीबीच्या चाहत्यांनी दरवर्षी दिला होता. १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीने अखेर ट्रॉफी जिंकली.