“मीना कुमारींना कळलं होतं त्या जगणार नाहीत”, ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी काय सांगितलं?
१९७२ मध्ये सावन कुमार यांनी "गोमती के किनारे" चित्रपटाची घोषणा केली, ज्यात मीना कुमारी होत्या. त्यांच्या प्रकृतीमुळे चित्रपटाचं शुटिंग थांबलं आणि खर्च वाढला. त्यामुळे मीना कुमारी यांनी वांद्रेतील बंगला मुमताज यांना विकला. मुमताज यांनी स्पष्ट केलं की, मीना कुमारी दिवाळखोर नव्हत्या, त्यांनी सावन कुमार यांना मदत करण्यासाठी बंगला विकला. मुमताज यांना हा बंगला लकी ठरला आणि त्यांच्या करिअरला गती मिळाली.