मुंबईची पूर्व किनारपट्टी सुरक्षित करणं हे इंग्रजांसाठी सर्वाधिक महत्त्वाचं होतं. या किनारपट्टीच्या पलीकडच्या बाजूस होतं माहूल, पनवेल, उरण आणि या भागाशी तत्कालीन मुंबईचा नित्य व्यवहार होत होता. त्यामुळे शिवडीच्या या टेकडीवर इंग्रजांनी किल्ला बांधला.
चिमाजी अप्पाने वसई ताब्यात घेतल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेसाठी इंग्रजांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली कारण त्यांची गाठ होती मराठ्यांच्या महासत्तेशी. जाणून घेऊ या किल्ल्याचे भूराजकीय महत्त्व