गुरूनानक जयंतीच्या एका दिवसाच्या सुट्टीनंतर आजपासून पुन्हा देशभरातील बँकाचे व्यवहार सुरू होणार आहेत. मोदी सरकारने लागू केलेल्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटबंदीनंतर देशभरात चलनाचा तुटवटा निर्माण झाला आहे. त्यामुळे बँकांच्याबाहेर पैशांसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. आजदेखील काहीसे अशाचप्रकारचे चित्र पाहायला मिळू शकते.