करोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. देशांतर्गत सर्व सीमा खासगी आणि सरकारी वाहनांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांची घराकडे जाण्यासाठी पायी मार्ग अवलंबला आहे. पण, हीच बाब पाच जणांच्या जिवावर बेतली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरारजवळील मांडवी येथे भीषण अपघात झाला असून करोनामुळे घरी पायी जाणाऱ्या पाच मजुरांचा अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.